एटीएसचा बोरिवलीत छापा: मुंबई एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई केली आहे. एटीएसने मुंबईतील बोरिवली भागातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून सहा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एटीएसने तीन बंदुका आणि २९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले सर्वजण दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
सहा जणांना अटक
मुंबई, झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले. "एका गेस्टहाऊसमधून आम्ही सहा आरोपींना अटक केली आहे. एटीएस आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. एटीएस आणि पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. एवढेच नाही तर त्यांच्याकडून तीन शस्त्रे आणि २९ काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. हे आरोपी यूपी आणि दिल्लीचे रहिवासी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) मुंबई युनिटने मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून 6 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त केली. अटक करण्यात आलेले सर्वजण दिल्लीचे रहिवासी आहेत. पुढील तपास सुरू आहे: ATS pic.twitter.com/ccU8laHfOz
— ANI (@ANI) 7 जानेवारी, 2024
एलोरा गेस्ट हाऊस, बोरिवली येथे छापे
माहितीनुसार, एटीएसला एलोरा गेस्ट हाऊस, बोरिवली येथे काही संशयितांची उपस्थिती असल्याची गुप्तचर माहिती मिळाली. यानंतर एटीएस आणि मुंबई पोलिसांनी बोरिवली येथील एलोरा गेस्ट हाऊसवर छापा टाकून सहा जणांना अटक केली. दरम्यान, अटक करण्यात आलेले सर्व संशयित यूपी आणि दिल्लीचे रहिवासी असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींची चौकशी सुरू आहे. एटीएसचे पथक सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करत आहे.